loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

पक्षाविषयी

महामोर्चा

आंदोलनं व उपक्रम

महामोर्चा

एखाद्या मुद्द्यावर, प्रश्नावर जनमत किती तीव्र आहे ह्याची जाणीव व्हावी ह्यासाठी मोर्चे काढले जातात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पक्ष स्थापनेपासून राज्यव्यापी मोर्चे काढले ते कधी प्रक्षोभ व्यक्त करायला होते तर समर्थनार्थ होते.

7

इशारा महामोर्चा

नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (CAA-NRC) विरोधात देशभर सूडबुद्धीने मुसलमानांकडून मोर्चे काढण्यात आले होते. कायद्यातील तरतुदी लक्षात न घेता राम मंदिर निर्माणाचा, ३७० कलम हटविल्याचा राग म्हणून देशभर मोर्चे काढले जात असतील तर त्या मोर्चांना मोर्चाने उत्तर देणं गरजेचं होतं. जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ९ फेब्रुवारी २०२० रोजी विराट मोर्चा काढून दिलं.

| महामोर्चाची क्षणचित्रं 

नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्यांतर्गत वर्षानुवर्षे देशात राहणाऱ्या कुण्याही भारतीयांना बाहेर काढलं जाणार नाही पण जे बांग्लादेशी-पाकिस्तान घुसखोर आहेत त्यांना हुसकावण्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जे योग्यच आहे. तसंच पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश ह्या देशांमध्ये अल्पसंख्यांक (ज्यात प्रामुख्याने हिंदू आहेत) म्हणून धार्मिक अत्याचार केले जात असतील आणि भारताचं नागरिकत्व हवं असल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय करारानुसार नागरिकत्व देण्यात येईल. हा कायदा १९५५ सालापासूनचा आहे आणि त्यात वावगं काय? म्हणून ह्या दोन्ही कायद्याच्या समर्थनार्थ हा इशारा महामोर्चा काढण्यात आला होता.

संताप मोर्चा

महाराष्ट्रातील महानगरांमध्ये रोजच्या रोज आदळणाऱ्या लोंढ्यांमुळे इथल्या नागरी व्यवस्थांवर प्रचंड ताण असतो. ज्याचा दुष्परिणाम इथल्या नागरी सुविधा… पाणीपुरवठा, वीज पुरवठा, रोजगार, राहणीमान आणि दळणवळण ह्यांच्यावर प्रामुख्याने होतो. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शहरांमध्ये धावणाऱ्या रेल्वे गाड्या… खचाखच गर्दी, रोजचे अपघात, अपुऱ्या पडणाऱ्या रेल्वे गाड्या ह्यामुळे आधीच नागरिक नरक यातना सहन करत होते. त्यातच मुंबईत एल्फिन्स्टन स्थानकातील (बदललेलं नाव:-प्रभादेवी) येथे रेल्वे पादचारी पुलावर अफवेमुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि तब्बल ३० मुंबईकर मृत्युमुखी पडले. दसऱ्याच्याच पूर्वसंध्येला घडलेली ही सुन्न करणारी घटना व्यवस्थेतील अनागोंदी प्रकर्षाने जाणवून देणारी होती. दुर्घटनेनंतर जी कारणं समोर आली त्यात रेल्वे व्यवस्थेवर वाढलेल्या प्रचंड ताणासह स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर आणि रेल्वे परिसरात असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे गर्दीचं व्यवस्थापन होत नाही असं निदर्शनास आलं. अशा निर्ढावलेल्या व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी, मुंबईकरांचा राग व्यक्त करण्यासाठी ५ ऑक्टोबर २०१७ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील रेल्वे मुख्यालयावर ‘संताप मोर्चा’ काढला.

| संताप मोर्चाची क्षणचित्रं 

नागरिकांनी ह्या मोर्च्याच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. मोर्चानंतर राजसाहेबांनी प्रशासनाला १५ दिवसांची मुदत देऊन रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करा अन्यथा आम्ही करू, अशी तंबी दिली. १५ दिवस झाले तरीही परिस्थिती जैसे थे होती, मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन हाती घेतलं आणि ४८ तासात मुंबई, ठाणे, पुणे येथील सर्व रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करून दाखवले. जे प्रशासनाला जमलं नाही ते महाराष्ट्र सैनिकांनी करून दाखवलं होतं. नागरिकांनी ह्या आंदोलनाबद्दल प्रचंड कौतुक करून असे मोकळे रस्ते आम्ही कधी पहिले नव्हते आणि रेल्वे स्थानकांनी मोकळा श्वास घेतल्याने आनंद व्यक्त केला.

निषेध मोर्चा

११ ऑगस्ट २०१२ रोजी मुंबईत आझाद मैदानात रझा अकादमीच्या सभेनंतर काही धर्मांध मुस्लिमांनी धुडगूस घालायला सुरुवात केली. पोलिसांवर, माध्यम प्रतिनिधींवर हल्ले केले. ह्या सर्व दंगलीत सुमारे ५८ पोलीस गंभीर स्वरूपात जखमी झाले. कोट्यवधींच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं. इतकंच काय तर अब्दुल कादिर ह्या दंगेखोराने ‘अमर ज्योती जवान’ स्मारकाची नासधूस केली.

ह्या सर्व धर्मांध उन्मादामुळे फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली. हा संताप व्यक्त होणं गरजेचं होतं. जनमानसातला राग व्यक्त करण्यासाठी त्याच आझाद मैदानावर श्री. राजसाहेब ठाकरेंनी मोर्चाची हाक दिली आणि मोर्चाची तारीख ठरली २१ ऑगस्ट २०१२. जनतेकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय म्हटल्यावर मोर्चाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचे प्रयत्न सुरु झाले आणि म्हणूनच कि काय मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. मोर्चाबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्यात येत होतं. तात्काळ राजसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन ‘सर्व गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळूनही रझा अकादमीच्या मोर्च्याला परवानगी दिली जाते आणि पुकारलेल्या शांततामय मोर्चाला परवानगी नाकारली जाते हा दुटप्पीपणा का? हिंदुस्थानात लोकशाही आहे म्हणता आणि लोकशाही मार्गानेच पुकारलेल्या शांततामय मोर्चाला आडकाठी करता, हि काय मोगलाई आहे का?’ असे जळजळीत प्रश्न विचारत ‘मोर्चा होणारच’ अशी वल्गना केली आणि कशाचीही भीडभाड न बाळगता श्री. राजसाहेब ठाकरे नेतृत्वात मोर्चा निघालाच.

| निषेध मोर्चाची क्षणचित्रं 

प्रचंड अशा ह्या मोर्चाने धर्मांध मुस्लिमांना सडेतोड उत्तर दिलं. मोर्चा आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर मोर्चाचं रूपांतर सभेत झालं आणि राजसाहेबांनी उपस्थितांना संबोधित केलं. माध्यमं आणि पोलिसांना पाठिंबा देण्यासाठी काढलेल्या ह्या मोर्चात राजसाहेबांनी हे दंगेखोर कुठून आले? बाबरी मशीद पाडल्यानंतर म्हणा किंवा आसामच्या धर्मांध दंगलीची प्रतिक्रिया दंगलस्वरूपात मुंबईतच कशी उमटते, हे सिद्ध केलं. तसंच भरसभेत आझाद मैदानावर सापडलेल्या एका बांग्लादेशी घुसखोराचं पारपत्र (पासपोर्ट) दाखवत घुसखोरीच्या धोक्याचा स्रोत नक्की कुठून आहे हेही सांगितलं. ह्या संपूर्ण दंगलीदरम्यान बेजबाबदारपणे वर्तन करणाऱ्या पोलीस आयुक्तांचा राजीनाम्याची मागणी करण्यात आली आणि पुन्हा जर आमच्या पोलीस बांधव-भगिनी अथवा महाराष्ट्राच्या जनतेकडे कुणी वाकडी नजर करून पाहिलं तर गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आहे असं धर्मांधांना ठणकावलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ह्या प्रचंड निषेध मोर्चामुळे जनमानसातील खदखद व्यक्त झाली. सर्वपक्षीय नेत्यांनी, सामाजिक संस्थांनी मोर्चाचं भरभरून कौतुक केलं. सर्वबाजूने लोकजागृतीचा दबाव वाढत गेल्याने बेजाबदारपणे लागलेल्या पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली.

जिथे जिथे म्हणून अन्याय दिसेल
तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे!

अन्यायाविरुद्ध वाचा ‘फोडण्या’साठी आणि व्यवस्थेचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सदैव तत्पर.

परिवहन (एसटी) कामगार मोर्चा

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तात्काळ ज्या संस्था आणि सेवा उभ्या राहिल्या आणि आजतागायत देशाला-राज्याला सेवा देत आहेत त्यापैकी एक म्हणजे परिवहन सेवा. महाराष्ट्रातील प्रत्येक गावांना, तालुक्यांना जोडणारी ही परिवहन सेवा अल्पावधीतच महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावू लागली. एकेकाळी ज्या परिवहन सेवेची अमेरिकेच्या ग्रे-हाऊंडशी तुलना केली जायची ती परिवहन बससेवा, आजही मरणयातना सोसत आहे. ह्या उपक्रमातील कर्मचारी अत्यंत शोषणीय आणि दयनीय अवस्थेत काम करत होता म्हणून मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे ह्यांनी २००८ साली ‘महाराष्ट्र नवनिर्माण परिवहन कामगार सेने’ची स्थापना केली आणि त्याचं नेतृत्व पक्षाचे नेते-प्रवक्ते श्री. अविनाश अभ्यंकर ह्यांच्याकडे सोपवलं.

| शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे

पहिल्या ४ वर्षात संपूर्ण परिवहन सेवा, तिथल्या कर्मचाऱ्यांशी सुसंवाद आणि व्यवस्थेचा अभ्यास करून ‘महाराष्ट्र नवनिर्माण परिवहन कामगार सेने’ने २०१२ साली कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी एक राज्यव्यापी मोर्चा काढला. मोर्चाला कामगारांचा पाठिंबा मिळू नये म्हणून कामगारांना नोटीसा पाठविण्यात आल्या, नोकरी वरून कमी करण्याच्या धमकी दिली गेली, तांत्रिक बाजू पुढे करून सरकारतर्फे मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. हा मोर्चा निघू नये म्हणून सरकारतर्फे कामगारांवर दबावतंत्र अवलंबलं जात होतं. अशा सर्व समस्यांवर मात करत अखेर ‘समान काम, समान दाम’ ह्या घोषवाक्यांसह ४० हजार परिवहन कामगारांचा विराट मोर्चा निघालाच. परिवहन कामगारांच्या एकजुटीची ताकद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे महाराष्ट्राला उमगली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे परिवहन कामगारांचा प्रश्न हा तेव्हापासून राज्याच्या केंद्रस्थानी आला.

दंडुका मोर्चा

२०१३ ते २०१८ महाराष्ट्राने दुष्काळाच्या झळा सोसल्या. प्रामुख्याने मराठवाडा दुष्काळात अगदी होरपळला होता. ह्या काळात दिवसाला सरासरी ४ शेतकरी आत्महत्या करत होते. ह्या भीषण परिस्थितीपुढे बळीराजा हतबल झाला. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकऱ्याने स्वाभिमानाने उभं राहावं, लढावं ह्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘दंडुका मोर्चा’ पुकारला.

| दंडुका मोर्चाची क्षणचित्रं 

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण, स्वामीनाथन आयोग लागू करावा, गेल्या खरीप हंगामातील पिक विमा मिळावा, कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार, बागायतदारांना एक लाख अनुदान, गाव तेथे चारा छावण्या, संपुर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, कृषि वीज आकारणी माफ करावी, कर्ज न देणाऱ्या बॅंकांवर कारवाई करा, बोंडआळीचे अनुदान तात्काळ देण्यात यावे, दुष्काळाची तीव्रता पाहता तातडीने पाण्याचे टॅंकर सुरू करावे, प्रतिव्यक्‍ती ५० लिटर पाणी द्यावे, रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करावीत, उसाला यथायोग्य हमी भाव अशा मागण्या मनसेच्या वतीने सरकारला दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या.

गिरणी कामगारांच्या न्याय्य-हक्कांसाठीचा मोर्चा

मुंबईतील गिरण्यांमुळे एकेकाळी मुंबई ओळखली जायची. इथल्या गिरणी कामगारांच्या घामामुळे, कष्टामुळे कापड उद्योग भरभराटीला आला होता. कामगार सचोटीने काम करत होता पण कालांतराने गिरणी मालकांना औद्योगिकीकरणाची काही वेगळीच दिशा खुणावत होती. ज्यामुळे कामगार आणि मालकांमध्ये संघर्ष उभं राहिला. कामगार नेत्यांच्या नेतृत्वात कामगारांनी संप पुकारला आणि जे घडू नव्हतं ते घडलं. गिरण्या बंद झाल्या आणि गिरणी कामगार देशोधडीला लागला. मुंबईतलं त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आणि कामगारांचे संसार उध्वस्त झाले.

| गिरणी कामगारांच्या न्याय्य-हक्कांसाठीचा मोर्चा 

आज त्या गिरण्यांच्या जागांवर टोलेजंग मॉल उभे आहेत, गगनचुंबी इमारती उभ्या आहेत पण ज्या कामगारांनी हा उद्योगासाठी रक्ताचं पाणी केलं त्यांचे संसार मात्र उघड्यावर आहेत. अशा गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचं घर मिळावं म्हणून मुंबईत एक सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्च्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली संपूर्ण ताकद लावली. स्वतः राजसाहेब ठाकरे मोर्च्यात सहभागी झाले होते.

| आंदोलनं व उपक्रम : नागरी आंदोलनं

 आंदोलनं व उपक्रम : मराठी मनांसाठी, हिंदू सणांसाठी |

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.